
Maharashtra Weather : अरबी समुद्रात पुन्हा नवीन चक्रवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू त्याअगोदर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील 20 जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार, कोकण आणि विदर्भात बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.
Maharashtra Weather | येत्या 48 तासात मुसळधार पाऊस
गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाचे संकट आहे. हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा हा तीव्र होणार असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऑरेंज आणि रेड अर्लट देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पुणे या तीन ऑरेज अर्लट देण्यात आला आहे. बुलढाणा, नांदेड, लातूर आणि यवतमाळ, सातारा, कोल्हापूर, ठाणे, पालघर, मुंबई, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, सांगली, लातूर, अकोला, बीड, हिंगोली, परभणी या सर्व जिल्ह्यात पुढील काही तासात अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवला आहे.
