Pik Vima : शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी 50 हजारांची मदत

Pik Vima : शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी 50 हजारांची मदत
Pik Vima : शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी 50 हजारांची मदत

 

Pik Vima : बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे नेते आहेत आणि बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री सुध्दा राहिलेले आहेत. यांच्या मते, राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने प्रति हेक्टर नुसार 50 हजार पर्यंत नुकसान भरपाई हि वाटप करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक आधार | Pik Vima

मे महिन्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, डाळिंब, तसेच टोमॅटो, आंबा, केळी आणि भाजीपाला मानवी जीवनात गरज असलेल्या प‍िकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्राणांचा मृत्यू तसेच महापूर आल्याने घरांचे नुकसान तसेच चारा कमी पडत आहे. खरीप हंगाम जवळ ऐताच शेतकऱ्यांचे मोठे झाले, यामुळे शेती करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आर्थिक आधार देऊन मदत हि जाहिर करावी.

राज्य सरकार गंभीर टीका

राज्यात भंयकर परिस्थिती न‍िर्माण झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोठे संकट कोसळले, तरीही राज्य सरकार मदत करताना किंवा पाठीशी उभा दिसत नाही. म्हणजेच राज्य सरकार किती गंभीर आहे यावरुन दिसत आहे. असे मत थोरात यांनी मांडले आहे.

NDRF/SDRF सहाय्याने राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देते परंतू प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही, अशी तक्रार मांडली आहे.

शेतकऱ्यांना तीन हेक्टर ऐवजी २ हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देणे, हे एक अन्यायच आहे. पिक विमा ( Pik Vima ) योजनेअंतर्गत बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असे चित्र दिसत नाही.

Maharashtra Monsoon Update : पुढील 24 तासात 26 जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार

राज्यात कर्जमाफी कधी होणार ?

निवडणूका पूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी ( karj mafi ) करु असे अश्वासन दिले होते परंतू अजूनही सुध्दा कर्जमाफी झाली नाही. सत्ता मिळाल्यानंतर राज्य सरकार कर्जमाफी विसरली दिसत आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार यांचे मोठे गठबंधन असताना राज्यात सर्वात मोठी कर्जमाफी करण्यात आली होती. महायुतीचे सरकार असताना मुकाट्याने गप्प का आहे ? असा थेट राज्य सरकारला विचारला आहे.

निष्कर्ष

सर्वात महत्वाचे म्हणजे, राज्यात खरीप हंगाम सुरु होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थ‍िक मदत हि वेळेवर मिळाली पाहिजे.

ज्या ठिकाणी नुकसानीचा दावा आहे, अश्या ठिकाणी पंचनामा गतीने झाला पाहिजे.

विरोधी पक्षातले बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी ( karj mafi ) तातडीने करावी अशी मागणी करावी.

राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ( Ladki Bahin Yojana Update ) योजनेअंतर्गत मोठी कारवाई होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment