Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, राज्यात पीक विमा वाटप होणार

Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, राज्यात पीक विमा वाटप होणार
Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, राज्यात पीक विमा वाटप होणार

 

Crop Insurance : 2022 मध्ये खरीप चालू असताना अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना आधार म्हणून महाराष्ट्रातील राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक निधी देऊ असे आश्वासन दिले होते. तसेच तहसील आणि अनेक अधिकारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे फेरा मारत असत परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तरीही नुकसान भरपाई मिळाली नाही. विशेष म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळालीच नाही परंतु 2025 वर्षी महाराष्ट्र सरकारला जाग आली आणि एक शासन निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विमा हा जमा केला जाईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पीक विमा वाटप | Crop Insurance

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. 2022 पासून रखडलेला पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2022 पासून ते 2024 पर्यंत खरीप, रब्बी अशा हंगामातील नुकसान भरपाई रखडली होती. मिळालेल्या माहितीनुसार 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई पोहोचलेली नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजगी आहे.

महाराष्ट्र सरकार विमा कंपन्यांना अनुदान देत नसल्यामुळे पीक विमा हा रखडलेला होता अखेर २०२५ मध्ये महाराष्ट्र सरकारने 2852 कोटी रुपयांचा पिक विमा हा मंजूर केला. परंतु हा पिक विमा कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे.

महाराष्ट्र सरकारने खरीप 2022 आणि रब्बी 2023 पर्यंत २ कोटी ८७ लाख रुपये म्हणजे 110% पेक्षा अधिक रक्कम ही मंजूर केली आहे. तसेच खरीप 2023 मधील शेतकऱ्यांसाठी 181 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत. रब्बी 2023 आणि 24 यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 63 कोटी रुपये मंजूर करण्यात आली आहे. खरीप हंगाम 2024 मधील शेतकऱ्यांसाठी सर्वात ऐतिहासिक मोठा निर्णय 2308 कोटी रुपये इतकी मोठी नुकसान भरपाई शेतकऱ्यांकरिता मंजूर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण रक्कम पाहिली तर 255 कोटी म्हणजे 64 लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे. याबद्दल तुमचे मत काय आहे नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा धन्यवाद.

विमा कंपन्याना 5 वर्षांत 50 हजार कोटीचा नफा, शेतकरी कर्जबाजारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Sharing Is Caring:

marathi bigg boss

मी Marathi Bigg Boss सखोल अभ्यास करुन लेखन आणि पत्रकाराच्या भूमिकेत अनेक वर्षा पासून काम करत आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या हक्का विषयी बातमी सखोल मांडत असतो.

View all posts by marathi bigg boss

Leave a Comment