
Weather Update : गेल्या १२ दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप घेतलेली आहे. परंतू राज्यातील कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण आहे. भारतीय हवामान विभागाने ( imd ) दिलेल्या अंदाजनुसार मुंबई मध्ये तूफान पाऊस होऊ शकतो, यासाठी येलो अर्लट जारी केला आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोकण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. यामुळे तेथील नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.
मुंबई चा हवामान अंदाज | Weather Update
मुंबई मध्ये गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण पाहयला मिळत आहे. imd ने दिलेल्या अंदाज नुसार येत्या तीन दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. मुंबई मधील नागरिकांनी आपल्या घरांची तसेच आपली काळजी घेतली पाहिजे.
आज पाऊस होणार का ?
आता पर्यंत कोकण भागात सर्वाधिक पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले पाहयला मिळत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. तसेच पुढील काही दिवसासाठी हवामान खात्याने ऑरेंज अर्लट जारी केलेला आहे. येणाऱ्या काही कोकणसह वरील तीन जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होणार असून पूरांचा धोका सुध्दा वाढू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची आणि आपल्या कुटूबांची काळजी घेतली पाहिजे.
पुढील २४ तासात तूफान पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये पुढील २४ तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो.
पावसाची विश्रांती संपणार
राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून अनेक ठिकाणी पावसाने उघडीप घेतलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतू आता पावसाची विश्रांत संपणार आहे. येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढणार आहे.
निष्कर्ष
कोकण भागात मॉन्सूनने चांगली हजेरी लावली आहे. तसेच हळूहळू सगळी मॉन्सून हा सक्रीय होणार आहे. परंतू अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
7/12 Extract : सातबारा उतारा म्हणजे काय? | अंत्यत महत्वाची माहिती तुमच्यासाठी
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

