
Kharif Hangam 2025 : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून कर्नाटक तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील काही भागावर हा पोहचला आहे. परंतू या अगोदरचा राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले परंतू शेतकऱ्यांनी परेणी किंवा लागवड साठी घाई करु असे अहवान करण्यात येत आहे.
पेरणी केव्हा करावी ?
दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी हवामान खात्याचा अंदाज पाहणे गरजेचे आहे. गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात चांगलीच ओल निर्माण झाली आहे. हवामान खात्यानुसार २७ मे ते १ जून पर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. परंतू अहिल्यानगर, पुणे, कोकण नाशिक या ठिकाणी पावसाचे प्रमाण १ जून पर्यंत अधिक राहिल व उर्वरित भागात पाऊस कमी होईल. १ जून पासून ६ जून राज्यात कोरडे हवामान राहणार आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे पूर्ण करुन घ्यावी.
जमिनीची ओल चांगली असेल तरच पेरणी किंवा लागवडीचा निर्णय घेतला पाहिजे. जांणकरांच्या मते, १३ जून विदर्भात क्षेत्रात पेरणी लायक पाऊस असेल, १७ जून रोजी मराठवाड्यात आणि २१ जून रोजी उत्तर महाराष्ट्रात अशा प्रकारे पेरणी किंवा लागवड करण्यासाठी हा कालावधी आहे.
तुम्हाला काय वाटते ? नक्कीच कमेंट मध्ये कळवा.
Crop Damage Compensation : शेती पीकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत दिली जाणार