
Pik Vima : 2022 पासून ते 2024 पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळाली नाही. परंतु महाराष्ट्र सरकारने एक पीक विमा संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिक विमा चा पहिला हप्ता मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकार 2 हजार 308 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई विमा कंपनीकडे वितरित केली जाईल, यामुळे विमा कंपन्या तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याचा पहिला हप्ता वितरित करतील.
64 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर | Pik Vima Today
2022 पासून ते 2024 पर्यंत लाखो शेतकऱ्यांचे अनुदान हे थकीत होते. 2022 ते 2023 तसेच 2023 ते 2024 या कालावधीतील रब्बी आणि खरीप हंगामातील नुकसान भरपाई अडकली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने यावरती तोडगा काढला आहे. 2022 ते 2024 या कालावधीतील एकूण 2 हजार 555 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजुरी दिली, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याशिवाय 2022 ते 2023 मध्ये 110% तसेच 2023 ते 2024 मध्ये 110% इतकी रक्कम राज्य शासनाकडे अडकली आणि मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने विमा कंपन्यांना रब्बी हंगामातील रक्कम ही वितरित केलेली नव्हती. ज्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता देण्यास उशीर झाला आहे.
2022 मध्ये मंजूर झालेला पीक विमा अध्याप शेतकऱ्यांना न मिळण्यामुळे यावरती चांगली चर्चा सुरू झाली आहे. 2022 पासून ते 2024 पर्यंत संपूर्ण नुकसान भरपाई 2852 कोटी रुपये होत असून ही राज्य सरकारकडे अजूनही आहे. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र सरकार शासन निर्णयाद्वारे अनेक निधीला मंजुरी देत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 64 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही 2022 पासून ते 2024 पर्यंत मिळालेली नव्हती खरीप हंगाम 2022 ते 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने दोन कोटी 87 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई दिलेली नव्हती. तसेच 2023 मध्ये 181 कोटी आणि रब्बी हंगामात 2024 मध्ये 63 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई दिली नव्हती, परंतू महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2308 कोटी रुपये 64 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद
Pik Vima : पीक विमा योजनेत मोठे बदल! शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार ?
अजून किती पीक नुकसान भरपाई थकीत ?
- गेल्या २०२२ पासून ते २०२४ पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हि मिळाली नाही. अजूनहि शेतकऱ्यांना प्रतिक्षा पहावी लागत आहे.
- खरीप हंगाम = २८७ कोटी रुपये
- खरीप हंगाम = १८१ कोटी रुपये
- रब्बी हंगाम = 63 कोटी रुपये
- वरील रक्कम हंगामातील उर्वरित रक्कम आहे. २०२२ पासून २०२४ या कालावधीचा विचार केला तर २ हजार ८५२ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली होती.
- खरीप हंगामात राज्य सरकार २ हजार ३०८ कोटी रुपये वितरीत करणार आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे उद्देश सरकारने ठेवले आहे. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार केल्या, अनेकदा आंदोलन तसेच सरकार दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे.
तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का ?