
Pik Vima : महाराष्ट्रात दरवर्षी अनेक भागात अवकाळी पाऊस होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे अति प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांवरती पीक कर्जाचे डोंगर होते, हेच कर्ज कमी व्हावे यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीक विमा दिला जातो. महत्त्वाचे म्हणजे बहूतांश शेतकरी पीक विमा मध्ये सहभागी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी पिक विमा हा मंजूर झालेला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पी विमा जमा केला जाणार आहे.
2023 मध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतात पीकांचे नुकसान तसेच माती वाहून गेली होती, याची जाच पडताळणी झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दल दखल घेतली, त्यानंतर नुकसान भरपाई म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी पिक विमा हा मंजूर केला.
30 सप्टेंबर 20२3 रोजी एक शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता. यामध्ये 2023 मध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला या शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई खात्यावर वितरित करणार आहे. यामध्ये नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या सहा जिल्ह्यांसाठी राज्य सरकार 3310 कोटीचा निधी मंजूर केला. तसेच या जिल्ह्यामध्ये सिंचन प्रकल्प, रस्ते इतर बाब सुद्धा मंजूर केलेली आहे. यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळेल व त्यांची प्रगती होईल.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇