
Pik Vima : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील 23 लाख शेतकऱ्यांसाठी पिक विमा हा मंजूर झालेला आहे. 2024 मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, जुलै मध्ये भयंकर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते, याही वर्षी शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव मिळाला तसेच शेतकऱ्यांची उत्पादन सुद्धा घटले होते. शेतकऱ्यांना सध्या आर्थिक मदतीची गरज होती. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मजूर केलेली आहे.
पीक विमा वाटप | Pik Vima News 2025
28 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केला होता. यामध्ये लिहिले होते की जुलै ते ऑक्टोंबर कालावधीमध्ये भयंकर अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच महापूर सुद्धा आले होते. शेतकऱ्यांवर आधीच कर्ज असल्यामुळे शेती करणे मुश्किल झाले होते. यासाठी राज्य सरकारने दोन हेक्टर ची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याची मंजूर केली आहे.
आत्तापर्यंत ठाणे जिल्ह्यात १०९ शेतकऱ्यांना तीन लाख पर्यंत नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात 2730 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 67 लाख इतकी रक्कम वाटण्यात आलेली आहे.
रायगड मध्ये 113 शेतकऱ्यांसाठी तीन लाख 25 हजार रुपये वाटण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 61 शेतकऱ्यांसाठी एक लाख एकवीस हजार रुपये, हे वाटण्यात आले आहे. सिंधुदुर्ग मध्ये 196 शेतकऱ्यांसाठी पाच लाख रुपये वाटण्यात आले आहे.
उर्वरित रक्कम नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती पूर्ण वाटल्यास व्हाट्सअप ग्रुप वर नक्की जॉईन व्हा.
Pik Vima : 1 रुपया मध्ये पीक विमा पाहिजे असेल तर हे कागद पत्रे तयार ठेवा ?