
Pik Vima News : महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेत बदल केले आहेत. यावेळेस शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत विमा प्रीमियम भरणे अनिवार्य आहे. तसेच पीक विमा संदर्भात ट्रिगरात बदल करण्यात आले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनवर काय पिरणाम होऊ शकतो हेच आपण जाणून घेणार आहोत.
नुकसान भरपाईचे नवीन नियम
या अगोदर राज्यात अनेक ट्रिगर अंतर्गत पीक विमा ( Pik Vima ) वाटप केला जात होता. परंतू नवीन नियम आल्यापासून राज्यात पीक कापणी प्रयोग आणि आधारावर राज्यात नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. जर शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाले तर यावरती सुध्दा नुकसान भरपाई मिळू शकते.
E Pik Pahani : ई पीक पाहणी जलद होणार | तलाठी सहाय्यकांना अधिक मानधन मिळणार
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
सॅटेलाइट द्वारे डेटा हो गोळा होईल तसेच यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. यामुळे नुकसान भरपाईचे पंचनामे लवकर होतील.
विमा प्रीमियम
- २ टक्के प्रीमियम आता शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी भरावा लागणार आहे.
- १.५ टक्के प्रीमियम रबी हंगामात भरावा लागणार आहे.
- ५ टक्के प्रीमियम हे व्यापारी पिकांसाठी प्रीमियम आहे.
निष्कर्ष
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे नक्कीच भ्रष्टाचाराला आळा बसेल, नवीन प्रक्रिया असल्यामुळे शेतकऱ्यांना जुळवून घेण्यासाठी कठीण जाऊ शकते. यामुळे मार्गदर्शन प्रक्रिया राज्य सरकार राबवणार आहे.
Farmer Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफ व लाडक्या बहिणांना 2100 रुपये सुरु