
Weather Update : राज्यात दिवसांन दिवस तापमान वाढत आहे. परंतू हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या अंदाज नुसार पुढील आठवड्यात राज्यातील वातावरणात बदल होणार आहे. हवामान खात्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी तापमान वाढणार तसेच अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
पुढील आठवड्यातील हवामान अंदाज | Weather Update
हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार कोकण, खानदेश आणि इतर 26 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, गडचिरोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती असे इतर जिल्हे सुद्धा यामध्ये शामील आहेत. तीन मे ते १० मे पर्यंत राज्यात ठीक ठिकाणी किरकोळ ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. जोरदार वारे वीजासह पाऊस होऊ शकतो, परंतु हा पाऊस किरकोळ राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु शेतकऱ्यांनी विशेष घाबरू नये, असे मत हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.
हवामान अभ्यासाक यांच्या मते विदर्भात सात जिल्ह्यात अवकाळी पावसाची संकट राहणार आहे. सध्याच्या परिस्थितीत त्या ठिकाणी तापमान जास्त आहे. परंतु अवकाळी पावसाची संकट हे नाकारता येणार नाही. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, अकोला, अमरावती या ठिकाणी तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रात तापमान हे चांगल्या प्रकारे वाढलेले आहे. ज्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. विदर्भात 45 ते 50 डिग्री पर्यंत तापमान पाहायला मिळते, परंतु पुढच्या आठवड्यात तापमानात बदल झालेला पाहायला मिळू शकतो.