राज्यातील महिला आता केवळ नोकरीच्या शोधात नाहीत, तर त्या स्वतः उद्योजक बनून इतरांना रोजगार देत आहेत. राज्य शासनाच्या ‘आई पर्यटन योजने’ला (Aai Tourism Policy) सध्या मराठवाड्यातून, विशेषतः आपल्या छत्रपती संभाजीनगर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्हीही स्वतःचा एखादा हॉटेल, रिसॉर्ट किंवा ट्रॅव्हल एजन्सी सुरू करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर पर्यटन विभागाची ही नवीन अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे, कागदपत्रांच्या जंजाळात न अडकता आतापर्यंत ९०० हून अधिक महिलांचे व्यवसाय प्रत्यक्षात सुरू देखील झाले आहेत!

आई पर्यटन योजनेची माहिती
शासनाने महिलांना पर्यटन क्षेत्रात भक्कमपणे उभे करण्यासाठी जी ‘आई महिला केंद्रित पर्यटन धोरण’ योजना आणली होती, तिची अंमलबजावणी आता खूप वेगाने सुरू आहे. पर्यटन संचालनालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून ४,२०० हून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. यापैकी सुमारे ९०० महिलांच्या व्यवसायांना हिरवा कंदील मिळाला असून, त्यांना तब्बल ७२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
सर्वाधिक आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे, या योजनेत केवळ मोठ्या शहरांमधीलच नव्हे, तर कोकण, पुणे, नाशिक आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागातील महिला आघाडीवर आहेत. म्हणजेच, स्थानिक पातळीवर या महिला पर्यटन योजनेचा टक्का वेगाने वाढत आहे.
आई पर्यटन योजना काय फायदा मिळेल?
ही योजना वाचायला किंवा ऐकायला गुंतागुंतीची वाटत असली, तरी ती समजून घेणे खूप सोपे आहे. शासनाच्या या उपक्रमाचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- १५ लाखांच्या कर्जावरील व्याज परतावा: तुम्हाला शासनाने ठरवून दिलेल्या ३० पैकी कोणत्याही व्यवसायासाठी बँकेकडून १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कर्जावरील व्याजाचा परतावा पर्यटन विभाग स्वतः करेल. (हा परतावा १२ टक्क्यांपर्यंत, सलग ७ वर्षे किंवा जास्तीत जास्त ४.५ लाख रुपयांपर्यंत मिळेल).
- कोणते व्यवसाय करता येतील?: तुम्ही होम स्टे (Home Stay), रेस्टॉरंट, कृषी पर्यटन केंद्र (Agro Tourism), हस्तकला दुकान, आयुर्वेद केंद्र किंवा अगदी साहसी पर्यटन (Adventure Tourism) केंद्रही सुरू करू शकता.
- ५० टक्के महिला स्टाफची रोजगार साखळी: जर तुम्ही ट्रॅव्हल एजन्सी किंवा मोठे हॉटेल सुरू करत असाल, तर तिथे काम करणारे किमान निम्मे कर्मचारी (५०%) या महिलाच असणे बंधनकारक आहे. म्हणजेच तुमच्या प्रगतीसोबतच इतर स्थानिक महिलांनाही हक्काचा रोजगार मिळेल.
- १००% मालकी हक्क: योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यवसायावर १०० टक्के मालकी संबंधित महिलेचीच असणे अनिवार्य आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्र. १: आई पर्यटन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कुठे आणि कसा करायचा? उत्तर: तुम्हाला महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत aai-portal.maharashtratourism.gov.in या पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. तिथे ‘Registration’ टॅबवर क्लिक करून तुम्ही माहिती भरू शकता.
प्र. २: यासाठी कुठली महत्त्वाची कागदपत्रे लागतात? उत्तर: अर्ज करताना तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, ५० रुपये प्रक्रिया शुल्काची पावती, व्यवसायाच्या जागेचा पुरावा (७/१२ किंवा भाडेकरार) आणि प्रकल्पाची ५०० शब्दांत थोडक्यात माहिती अपलोड करावी लागते.
प्र. ३: ही योजना फक्त शहरात चालते की ग्रामीण भागातही? उत्तर: ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे! उलट ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिला ‘कृषी पर्यटन केंद्र’ (Agro Tourism) सुरू करून पर्यटकांना गावाकडे आकर्षित करत आहेत आणि चांगला नफा कमवत आहेत.
पुराव्यांच्या लिंक्स आणि संपर्क: या योजनेची सविस्तर माहिती आणि सत्यता पडताळण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाची अधिकृत वेबसाईट maharashtratourism.gov.in तपासू शकता.
marathi bigg boss
सचिन पोपळघट गेल्या ८ वर्षांपासून कृषी अभ्यासक म्हणून कार्यरत असून, 'शेतकरी हाच खरा 'marathi bigg boss' या ध्येयाने मी काम करत आहे. तंत्रज्ञान आणि शेतीची सांगड घालून, सरकारी योजना व पीक विम्याची अचूक माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. ८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि जमिनीवरची माहिती यामुळे हजारो शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आहे

