
Pik Vima : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत लाखो शेतकरी लाभ घेत असतात. २०२४ मध्ये खरीप हंगाम चालू असतान अतिवृष्टी मुळे लाखो शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१९७.१५ कोटी रुपये इतका निधी शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे : शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा हप्ता लवकरच मिळणार, त्यासाठी विम्याचा आम्ही विमा कंपन्याकडे वितरीत करत आहोत. सध्याच्या परिस्थिती अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे थोडाफार उशीर होईल पण ३१ मार्च पूर्वीच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाईल.
आमदार राहूल पाटील : याच्या मते, महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाईल असे म्हटले होते. परंतू हे राज्य कडून झालेले नाही. योगेवेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत हि पोहचली नाही.
IMD News : चक्रवादळामुळे पुढील दोन दिवसात 10 जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता