
Pik Vima News : खरीप हंगामातील पीक विमा कधी येईल, याच प्रतिक्षात महाराष्ट्रातील शेतकरी वाट पाहत आहे. २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पहिला हप्ता म्हणजे २१६० कोटी रुपये हे अडकवले आहेत. नैसर्गिक संकटाचा सामान करुनहि शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले परंतू शेतकऱ्यांना आर्थिक मदत राज्य सरकारकडून मिळाली नाही.
पीक विमा कधी मिळणार ?
कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शेतकऱ्यांना पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास ७०० कोटीचा पीक विमा हा जमा केला जाईल. खरीप हंगाम २०२४ मध्ये नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच पंचनामे सुध्दा करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत. ५४ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला आहे.
राज्य सरकारने पीक विमा देण्यासाठी विमा कंपन्याकडे कोणताहि निधी हा वितरीत न केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. महत्वाचे म्हणजे कृषी विभागाकडे कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा हा किती वाटप करायचा हि सर्व माहिती उपलब्ध आहे.
किती जिल्ह्यांना पीक विमा मंजूर ?
खरीप हंगाम २०२४ मध्ये राज्यातील २२ जिल्ह्यांत शेती पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, पुणे, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांना महाराष्ट्र सरकार आता येत्या दोन दिवसात ७०० कोटी रुपये म्हणजे पहिला हप्ता हा वितरीत करणार आहे. “Pik Vima News”
या २२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनसाठी राज्य सरकारने १४५५ कोटी इतकी नुकसान
भरपाई मंजूर केली आहे. तसेच या मधून आतापर्यंत फक्त ९६ कोटी रुपये इतकी रक्कम हि वाटप करण्यात आली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा हा जमा होण्याची शक्यता आहे.
Google Pixel 9a vs iPhone 16e: कोणता चांगला स्मार्ट फोन आहे ते पहा ?